शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:34 IST

नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नूल येथे केली.नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक ...

नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नूल येथे केली.नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन वास्तू उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. आमदार संध्यादेवी कुपेकर, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, श्री भगवानगिरी महाराज, सरपंच बाजीराव चव्हाण, कल्लाप्पाण्णा नडगदल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री पाटील म्हणाले, नूल गावच्या विकासकामांची यादी करून वर्षभरात कामे मार्गी लावली जातील. गावासाठी बहुउद्देशीय सभागृह बांधून देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. संपादक जाधव, अ‍ॅड. शिंदे, आमदार कुपेकर यांचीही भाषणे झाली.मंत्री तावडे यांच्याहस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन तर संजय थोरात लिखीत ‘विद्या दानीश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. मंत्री तावडे यांचा संस्था सचिव नानाप्पा माळगी यांच्याहस्ते सत्कार झाला. जयसिंग चव्हाण, विनोद नाईकवाडी, अभिजित चौगुले, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, संजय थोरात आदींसह संचालकांचा मंत्र्यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, किसनराव कुराडे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, योगेश जाधव, जि. प. सदस्या अनिता चौगुले, सभापती जयश्री तेली, प्रांताधिकारी संगीता चौगुले, आदी उपस्थित होते.अपघाती मृत्यू झाल्यास मोफत शिक्षणनव्या अपघात योजनेत प्रती विद्यार्थी दहा रुपये शासन विमा कंपनीकडे भरेल. विद्यार्थी अपघातात जखमी झाल्यास संपूर्ण वैद्यकीय खर्च तर पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतल्याची माहितीही तावडेंनी यावेळी दिली.